तुळशीचे लग्न….आपले सण समजून घ्या

Posted: नोव्हेंबर 19, 2010 in आपले सण समजून घ्या
टॅगस्, , , , , , ,

तुळशीचे लग्न (तुलसी विवाह)

कार्तिक शुद्ध प्रबोधिनी एकादशीला चातुर्मास व्रत समाप्त होते. एकादशी ते पौर्णिमा या कालावधीत मुख्यत्वे द्वादशीला श्रीविष्णूचा तुळशीसी विवाह साजरा करण्याची पध्दत आहे.

तुळस हि घराघरात असणारी एक पवित्र व उपयुक्त वनस्पती आहे. आपल्या हिंदू संस्कृतीने तर तिला मानवाचा दर्जा बहाल केला आहे. ती बहुगुणी व ओषधी आहे. देवपूजा व श्राद्ध यामध्ये तुळस अवश्य लागते. श्रीविष्णूस तुळस अतिप्रिय म्हणून तिला हरिप्रिया म्हणतात. हिंदू मान्यतेनुसार तुळशीच्या नुसत्या दर्शनाने हजारो गायी दान केल्याचे पुण्य लाभते. तिच्या पानावरचे उदक मस्तकावर धारण केले तर गंगास्नानाचे पुण्य लाभते. मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असेल तर व्यक्ती वैकुंठास जाते. इतके तुळशीला महत्व आहे.

तुळशीमध्ये कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेऊन ऑक्सिजन वायू सोडण्याचा गुणधर्म जास्त असल्यामुळे शरीर निरोगी राखण्यास तिचा उपयोग होतो. दारात वा घरात तुळशीचे झाड असल्यास घरात पिसवा, हिवतापाचे जंतू  शिरकाव करीत  नाहीत. तुळस प्रदूषणनाशक आहे. ताप, सर्दी, खोकला दूर करणे, हवा शुद्ध करणे ई. तीचे महत्वाचे गुणधर्म आहेत.

अशा या सर्वगुणसंपन्न तुळशीने आपल्या सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक जीवनात अढळपद प्राप्त केले आहे. म्हणून घरातील सर्वांनी देवांप्रमाणेच तुळशीचे दर्शन घ्यावे.

यावर आपले मत नोंदवा